श्री. केशवराव चेरकु यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत bap ha bap asto marathi kavita विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
bap ha bap asto marathi kavita
काव्यबंध समुह आयोजित काव्यलतिका
दिनांक – १५/१०/२३
तुझा बाप | bap ha bap asto marathi kavita
बघितला नाही कधी तु तुझा बाप
शहाणा झाल्यावर आई सांगायची।
काय कुणाची बिशाद तया समोर
गावात त्याचा शब्दांला मोडायची।।१।।
सरपंच होता गावाचा अन् नेहमीच
काळजी गावाच्या लेकरा बाळांची।
म्हणायचा शाळा पाहिजे गावात
सर्व लेकरे शिकली पाहिजे गावची।।२।।
शिक्षणाला पर्याय नाही म्हणायचा
ग्रामस्वच्छता अभियान राबवायचा।
गावात शाळा पाहिजे म्हणून धावपळ
जिल्हाधिकारी कार्यालयात करायचा।।३।।
गावातील शेतकऱ्यांसाठी सरकारी
योजना आणण्याचा प्रयत्न करायचा।
माझं गाव आदर्श गाव झालं पाहिजे
याचा ध्यास घेऊनच नेहमी जगायचा।।४।।
लोकांचा बी त्याच्यावर लई विश्वास
एकाच हाकेला गाव जमा व्हायचा।
एकोप्याने केलेल्या कामाला नेहमी
यश नक्कीच येते असं म्हणायचा ।।५।।
आज गावात शाळा, पक्की सडक
गावात नळाच्या पाण्याची सोई केली।
खूप काही सरकारी योजनांतून करुन
गावाला पारितोषिक ही मिळवून दिली।।६।।
देवालाही अशी लोक पाहिजे असतात
त्याला निरोप पाठवला की ये लवकर।
आपणास इथे सोडून अल्प आजारात
तुझा बाप आम्हा सोडून गेला लवकर।।७।।
दवाखान्यात आईला म्हणाला होता की
मी सरपंच म्हणून कर्तव्ये पार पाडलीत।
पण स्व कर्तव्य व माझ्या मुलाचं शिक्षण
सर्व कर्तव्ये आता तुझ्यावर सोडलीत।।८।।
असा पण मी न बघितलेला माझा बाप
आई माझ्या डोळ्यासमोर उभा करते।
बाबा न बघितल्याची खंत नेहमी आहे
त्यांची कार्यप्रणाली,विचार प्रेरणा देते।।९।।
श्री केशवराव चेरकु
कोपरखैरणे नवी मुंबई
bap ha bap asto marathi kavita
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.
आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह