काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी Kashmira Ulhas Gupte यांची -किमयागार निसर्ग – हि कविता एक Nisarg Kavita आहे
किमयागार निसर्ग | Nisarg Kavita

निसर्ग हा किमयागार
आहे आठवणीतला
तुझ्या आमच्या सोबतीला
घेऊन आला पाऊस
निसर्गाची किमया भारी
निर्मिती केली मानवसाठी
सगळं काही दिले
आता काही नाही उरले
निसर्गाची किमया
साधली सगळं काही
आनंदी झाले
आठवण झाली पावसाची
रौद्र रूप धारण करू
निसर्गाची किमया भारी
पाऊस पडे
मौन घडे
क्षणाक्षणाला निसर्ग बदले
पक्षी, कीटक मानव
होई आनंदी
निसर्गाची देणगी
आहे आठवणीतली
फळे, फुले औषधे
दिली निसर्गाने
निर्मिती ही निसर्गाची
पहिला पाऊस पडे
चैतन्य घडे
मन होई प्रसन्न
मानव होई आनंदी
निसर्गाचे ऋतू वेगळे
ठिकठिकाणी निराळे
डोंगर दऱ्या फुले
पक्ष्यांची अप्रूप वाटे
आकाश जरी एकच असे
ठिकठिकाणी निराळे भासे
तिथले वातावरण
आकाश पान वैविध्य
कोकणातला समुद्र होतो
बेभान जरी
निसर्ग रौद्र रूप धारण
करुनी ही किमया
समुद्राच्या लाटांचा
आवाज कानी पडे
पक्ष्यांचा किलबिलाट
मनीं आनंदी घडे
निसर्गाच्या घटकांचा शक्ती
वाटे मनीं भीती
नवं निर्मिती केली निसर्गाने
वापर केला मानवाने
निसर्गाची किमया ही
रहस्यमय भव्य दिव्य
हिरे मोती वस्तूंमध्ये
बदल घडेल निसर्गाने
आपण आहोत निरोगी
निसर्गाची ही जीवनशैली
सूर्यप्रकाश पाऊस दिले
श्वास निसर्गाने दिला
निसर्ग नसेल तर
आपले काय होणार
पक्षी प्राणी मानव
श्वास जगू शकत नाही
निसर्गाच्या सान्निध्यात
मन प्रसन्न होई
चिंता दुःख कष्ट
दूर करी किमया निसर्गाची
पृथ्वीवर संसाधने मर्यादित
आपण वापर करत अमर्याद
अतिवापर केला जरी
निसर्गाचे होई नुकसान तरी
पाणी झाडे आपल्याला
बदल करण्यासाठी स्वीकारला
परिस्थितीनुसार जुळवून
निसर्ग आपल्याला शिकवत
हा जरी असेल संदेश
अतिवापर हानी करू नये
झाडे लावा झाडे जगवा
निसर्ग हा वाचवा
शेती औद्योगिकीकरण घरकाम
पाणी मोठ्या प्रमाणात
अतिवापर केला जरी
तरी होई वन्य जीव नाश
सौर ऊर्जा,पवन ऊर्जा
वापर केला उपक्रमात
निसर्गाचे होई संवर्धन
किमयागार निसर्ग
वृक्ष आपले सोबती
पर्यावरण रक्षण करी
बदल आयुष्याची शैली
सापडेल निसर्गाची किल्ली
निसर्ग ही अक्षरे
तीन आणि तीनच
अर्थ आहे मोठा
ही मानव खाण
निसर्गाचा नाश
मानव होई नाश
तरी मानवी किमया भारी
निसर्गाची किमया असेल
किमयागार निसर्ग | Nisarg Kavita

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
काश्मिरा ताई गुप्ते यांनी एकदम मस्त सुंदर आणि अप्रतिम अशी कविता निसर्ग या विषयावर साकारली आहे हि कविता जणू माझ्या हृदयास स्पर्शून गेल्याची भावना मला झाली खरंच काश्मीरा ताई गुप्ते यांनी खरंच खूप म्हणजे खूपच मस्त कविता आमच्या पर्यंत पोहोचवली त्या बद्दल मी त्यांचा खुप आभारी आहे
आपलेच काव्य रसिक:-अक्षय खंडागळे
काश्मिरा यांची निसर्गकविता खूप छान!मनाला भावली.