सौ. राधा खानझोडे आणि सौ. बिरादार वर्षाराणी संतोष यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi kavita for life विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
marathi kavita for life
काव्यबंध समूह आयोजित स्पर्धा…
दिनांक:-१/१०/२०२३
विषय:-आयुष्य..
आयुष्याचे गणित | marathi kavita for life
आयुष्याच्या सांजवेळी
बिनधास्त जगायचे
गेलेल्या स्मृतींना
अंतरंगी साठवायचे…!!१!!
जीवन क्षणभंगुर आहे
प्रत्येक क्षण वेचायचे
हार असो वा जीत
आनंदाने झेलायचे…!!२!!
खडतर वाटेतून
मार्ग सोपा काढायचा
जीवनाचा आनंदही
आपणच शोधायचा…!!३!!
आयुष्यांचे गणितही
आपणच सोडवावे
सुख, दुःख सारे कांही
समाधानात घालवावे…!!४!!
आयुष्य असे जगावे
हेवाच वाटावा
खरा आत्मविश्वास
अंगी बाळगावा…!!५!!
फुलासम सुगंध
दुसऱ्यांना देत रहा
फळ त्याचे निश्चितच
जीवनांत मिळे पहा….!!६!!
आपल्याच कर्तुत्वाने
मन सर्वांचे जिंकावे
नको तुलाना कोणाची
स्वप्न छान साकारावे…!!९!!
जगू सुंदर आयुष्य
जीवनाच्या वाटेवर
दुःखी ,कष्टी असतांना
मात करावी त्यावर..!!६!!
वाट आहे संघर्षाची
एकट्याला सोसायचे
जीवनाची गाणी गात
सुखदुःख झेलायचे…!!७!!
दूर दूर जाते वाट
चालतच राहायचे
प्रेमातल्या सावल्यांना
हळुवार जपायचे…!!८!!
सौ. राधा खानझोडे, नागपूर…
marathi kavita for life
काव्यबंद समूह आयोजित स्पर्धा
दिनांक -01 -10- 2023
विषय -आयुष्य
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
आयुष्यातील संघर्ष | marathi kavita for life
लहानपणापासून सुरू झालेला हा संघर्ष
आजपर्यंत चालूच आहे हा संघर्ष
ऐकले होते खूपदा की
जीवन हेच संघर्ष . .
नसेल कोणी सोबत संगतीला
चालायला शिकवले या संघर्षाने
काळवंडलेल्या आयुष्यात
माझ्या नाही कुणाचा आधार
तरी सुरूच होता माझा संघर्ष. .
सतत सांगत होते मी संघर्षाला
नको कोसू तू स्वतःला
नको कोसू या दिवसांना
उगवेल तुझाही दिवस उद्या
सांभाळ जरा या आसवांना . .
माझे स्वामी मला नेहमी सांगायचे
बाळा नको घाबरू तू या संघर्षाला
अशक्य असे काहीच नाही बाळा
धयेय आता दूर नाही. .
झाला यशस्वी इथे जो कोणी
तो कोणी शूर नाही
का ? समजतेस कमजोर स्वतःला
का?विचार करतेस या झोपलेलया लोकांचा . .
ऐकले होते मी खुपदा की
जीवन हेच संघर्ष. .
जीवन हेच संघर्ष. .
सौ बिरादार वर्षाराणी संतोष
संग्राम स्मारक विद्यालय
उदगीर
सहशिक्षिका
तालुका उदगीर
जिल्हा लातूर
marathi kavita for life
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.
आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह