श्री मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे आणि सौ. शारदा राम मालपाणी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi kavita on life text विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
marathi kavita on life text
काव्यबंध समूह आयोजित रविवारीय काव्यलतिका काव्य स्पर्धेसाठी
विषय:-आयुष्य
जीवन सुंदर | marathi kavita on life text
जीवन सुंदर आहे
ते होणार.
जो दुसऱ्यांना आनंद देणारं
तोच खरा आनंद घेणार
तोच कायम जीवनात सुखी राहणार..१..
आयुष्य म्हणजे फक्त नुसतं जगनं नाही.
नुसतंच आलेला दिवस घालवणं नाही.
उगवणारया दिवस कडून काहीतरी नवीन घ्याव.
प्रत्येक जिवानं छान जगावं..२..
आयुष्य जगताना मालक म्हणून न जगता
जीवन जगताना चालक म्हणून जगावं
स्वतः साठी जो जगतो
तो फक्त घरातल्या लोकांचाच राहतो..३..
मरावे परी किर्ती रूपे उरावे
मरणोत्तरही नाम जनलोकी रहावे
जे आज आपल्यात नाहीत
ते कर्तृत्वानं जिवंत आहेत..४..
जीवन सुंदर होते ऋण फेडता फेडता
फेडावे ऋण आईवडीलांचे
सहारा द्यावा त्यांना आधाराचा
पांग फेडावे त्यांच्या उपकाराचे..५..
जीवन मिळाले ज्यांच्यामुळे त्यांना न विसरावे
जीवनात वेडेवाकडे वागून उगाच न घसरावे
खूप मोठे झाल्यावर ज्यांनी मोठं केलं त्यांना न विसरावे
जे आहे आपल्याकडे त्यातच खुश रहावे..६..
आयुष्य जगताना जगा आणि जगू द्या
आयुष्य जगताना बघा छान आणि बघू द्या छान
जो राखल मोठ्यांचा मान ठेवलं लहानांचा सन्मान
तोच होईल सुंदर जीवनात महान..७..
श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे
देहू माळवाडी पुणे
9881058501
marathi kavita on life text
काव्यबंध साहित्य समूह आयोजित काव्य लतिका राज्यस्तरीय साप्ताहिक स्पर्धेसाठी कविता….
विषय …आयुष्य
दिनांक…1/ 10/ 2023
आयुष्यावर बोलू काही | marathi kavita on life text
आयुष्यावर बोलू काही
म्हणणे किती सोपे आहे
खडतर जीवन प्रवासात
संघर्ष नेहमी वाट पाहे !१!
जीवनात अनेकवेळा
नात्यात येतात चढउतार
कधी कधी जीवनात
नसतो कुणाचा आधार . !२!
कधी कधी जीवनात
फुलतात सुखाचे मळे
कधी कधी उठतात
मनात वेदनांची वळे. !३!
आयुष्याचे असे किती
वेगळेच रंग अन रुप
विरह, मिलन भावनांचे
असते संमिश्र स्वरुप . !४!
कधी कधी इंद्रधनुच्या
सप्त रंगाची उधळण
कधी कधी वाळवंटी
दुःखाची होते पखरण .!५!
कधी कधी आयुष्यात
काहीच उणे नसते
कधी जीवनात संकटाशी
झुंज देत जीणे असते. !६!
काटेरी वाटेने धैर्याने
जपून पाऊल टाकावे
हिंमत जोम साहसाने
सदैव लढत राहावे . !७!
कधी यशाचा मुकूट तर
कधी अपयशाचे काटे
आयुष्याच्या वळणावर
दुःख हृदयात दाटे.!८!
चलतीच्या मागे चालणे
ही जगाची असते रीत
दुःखीतांना जीव लावणे
हीच असे खरी प्रीत. !९!
आयुष्य म्हणजे काय?
श्वास अन उच्छवास
आयुष्य म्हणजे असते
आत्म्याचा दिव्य प्रवास.!१०!
🖊️🌹सौ. शारदा राम मालपाणी.
(काव्य सम्राज्ञी)
सर्वाधिकार सुरक्षित ©️®️
अमरावती
marathi kavita on life text
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.
आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह