रुपाली एस मठमती आणि सौ. मालती चव्हाण यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi poem on life struggle विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
marathi poem on life struggle
काव्यबंद समूह आयोजित कविता स्पर्धा
कवितेचा विषय – आयुष्य
आयुष्य कळेल | marathi poem on life struggle
दुःख ही सुखाची सावली , की छाया
कोडे सोडवून पहा , आयुष्य कळेल
रुखरुखणाऱ्या मनाचे , समाधान शोधा
दुःख संपेल , आयुष्य कळेल
जगाकडे पाठ नका फिरवू
तोंड द्यायला शिका , आयुष्य कळेल
जीवन हे देवालय नाही , आहे रणांगण
लढत रहा , आयुष्य कळेल
जग जिंकण्या इतकं सोप नाही , मन जिंकण
मन जिंकून पहा , आयुष्य कळेल
डोळ्यापेक्षा , मिटलेल्या डोळ्यांना अधिक दिसते
क्षणभर डोळे मिटून पहा ,आयुष्य कळेल
शब्दापेक्षा स्पर्श बोलका
आपुलकीने वागून पहा ,आयुष्य कळेल
पश्चिमेचा नंदादीप मंद मंद होतो आहे
संध्येची शोभा पहा ,आयुष्य कळेल
घनाचे घाव चुकविण्यासाठी
मनाच्या वेदना विसरून पहा , आयुष्य कळेल
सुंदर सुगंधी फुले केवळ दुरून पाहू नका
सुवास घेऊन पहा ,आयुष्य कळेल
रडावेसे वाटते ,पण रडे नाही फुटत
एकदा रडून पहा ,आयुष्य कळेल
प्रीती उमलणाऱ्या फुलासारखे हसते
प्रेम करून पहा ,आयुष्य कळेल
गुदगुल्या करीत पळणाऱ्या वाऱ्याशी बोला
बोलके व्ह्याल ,आयुष्य कळेल
विष वृक्ष हा मानवी जीवन
त्यास कल्पवृक्ष बनवून पहा , आयुष्य कळेल
रूपाली एस मठपती….
संकेश्वर…….
marathi poem on life struggle
काव्य बंध स्पर्धा आयोजित
काव्य लतिका साप्ताहिक स्पर्धा,
रविवार दि,१/१०/२०२३
विषय -आयुष्य
आयुष्यात रंग भरताना | marathi poem on life struggle
आयुष्य असंच असतं
तुमचं आमचं नेमकं काय
स्वतः अनुभवल्याशिवाय
आपल्याला कळत नसतं—१
आपण जसं रंग भरतो
तसं ते रंगीन होतं
कोणतही वादळ आलं
धाडसीने समोर जाणे असतं—२
दुःख असून रडताना असतो
हसवता हसवता रडवतो
जे पाहिजे ते मिळत नसतं
जे हावये ते मिळत नसतं–३
समुद्र असतो पाण्याने भरलेला
पाणी पिता येत नाही
तरी पाणी प्यायचे
स्वप्न असतं मनी—४
येणारा प्रत्येक दिवस
नवीन स्वप्न घेऊन येतो
धाव धाव धावत असतो
मांगे कधी वळत नसतो—५
आयुष्य खूप सुंदर आहे
सोबतीला नसेल कोणी
एकटे चालायचं असतं
काटे तुडवून जायचं–६
प्रवाह कोणताही असो
वाहून जायचं असतं
नवे नवे अनुभवांच
शहाणपण शिकायचं असतं–७
वाळलेल्या जुडवा सारखं
कधी कोलमडून पडेल
थोडं तरी जगून घेऊ
जगण्याला नयनी बघू—८
आनंद क्षणी येती
दुःखाला कोणी नसे
संकटांना डगमगून जाणं
हेच खरं उत्तर नसतं—९
सौ मालती चव्हाण,
सटाणा (नासिक)
marathi poem on life struggle
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.
आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह