सौ. रंजिता अमोल गोवेकर आणि सोमदत्त कुलकर्णी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi poem quotes on life विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
marathi poem quotes on life
काव्यबंद समूह आयोजित स्पर्धा
दिनांक -01 -10- 2023
विषय -आयुष्य
आयुष्याचे सोहळे | marathi poem quotes on life
मी आयुष्याचे सोहळे या
किती कितीदा मांडले….
सुखासोबत कित्येकदा इथे
मग दुःखही मजसवे भांडले…
मी संसाराचा खेळ अनोखा
आयुष्याचा मांडला….
क्षणा क्षणाला तुटला तरीही
मी कष्टाने तो सांदला….
घुसमटलेला जीव कित्येकदा
एकटाच रडला होता….
आयुष्याला जगता जगता
कित्येकदा हरला होता…
मग जगता जगता इतरांसाठी
जगणेच माझे राहून गेले
आयुष्याच्या त्या वळणावर
वळणेच माझे राहून गेले….
त्या वळणावर आयुष्याच्या
अलवार अस्पर्शीत स्वप्ने होती
जगण्यालाही भुरळ पडावी
अशीच तीही वळणे होती
पण सोडली मी माझी स्वप्ने
इतरांचे आयुष्य जपण्यासाठी….
ती सल काळजा…. जखमा ओल्या…
पण कुणी ना रडती माझ्यासाठी….
तरीही आयुष्याचे सोहळे या
मी हरघडी मांडणार आहे….
जगण्यातील हे जगणे माझे
मी पुन्हा नव्याने जगणार आहे…..
सौ. रंजिता अमोल गोवेकर
(अलिबाग)
marathi poem quotes on life
काव्य बंध समूह आयोजित स्पर्धा
विषय: आयुष्य
जगणे | marathi poem quotes on life
नाही मुळी वेळ थांबायला
काट्यावर असा धावतसे
अशा जगायच्या धडपडीत
सर्व मृगजळ सत्य भासे १
जगण्याचा खरा काय हेतू
मनाला विचारुन तु पाहे
जगात अर्थामागे धावताना
जगायचे राहून गेले आहे २
ज्याने सुंदर जीवन दिधले
त्याला पुर्ण विसरून गेलो
असे जगण्याच्या धडपडीत
ईश्वराला कसा मी विसरलो ३
नाही मनात मुळीच ती शांती
अस्वस्थ, चंचल जग हे सारे
अशा जगण्याच्या धडपडीत
चैतन्याला विसरलास कारे ? ४
कुठे वाटचाल चालली आहे
मला काहीच उमगत नाही
काही जगायचे राहून गेले
उगीच मम मनी वाटत राही ५
दिवसामागून दिवस चालले
ऋतू मागून ऋतू उलटले
आयुष्य जणू वैशाख वणवा
समाधान सर्व संपून गेले ६
©®सोमदत्त कुलकर्णी
कोल्हापूर
marathi poem quotes on life
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.
आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह