सौ. भारती राजेंद्र बागल यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Sainikavar marathi kavita in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
Sainikavar marathi kavita in 2024
काव्यबंद समूह आयोजित काव्य लतिका स्पर्धा दिनांक 25 फेब्रुवारी 2024
विषय सैनिकांविषयी कविता
निर्भयतेचा किनारा | Sainikavar marathi kavita in 2024
प्रतिकूल परिस्थितीतला लढा पाहून
झुकतो चरणावर त्यांच्या माथा
शब्दही अपुरे पडतात
गाण्यात त्यांच्या शौर्याची गाथा
भारत मातेचा रोमरोमात
नित्य भरलेला अभिमान
शत्रुवरती तुटून पडतात
विसरून देहभान
भारत माता की जय
घुमते गगनभेदी गर्जना
शेवटच्या क्षणी ही सांगतात ते
देशसेवेसाठी येईन पुन्हा पुन्हा
अभिमानाने देतात ते
प्राणांची आहुती
मातृभूमीच्या सेवेपुढे
फिकी सर्व नाती
चैतन्य येते उरात
पाहून त्यांचा तिरंग्याचा सलाम
युद्धभूमी वरती दिसतो त्यांच्यातच
कृष्ण आणि राम
नित्य स्मरावे बलिदान
या शुर पुत्रांचे
मातृभूमीसाठी अर्पण केले
आयुष्य ज्यांनी स्वतःचे
देश रक्षणासाठी सीमेवरती
देतात खडा पहारा
म्हणूनच आपल्या जीवनाला
लाभतो निर्भयतेचा किनारा
धन्य ती माई
जी जन्म देते शूरवीराला
मातृभूमीसाठी समर्पित करतो जो
अभिमानाने स्वतःला
सैनिकांच्याच भरवशावर
बिनधास्त आपला प्रत्येक श्वास
त्यांच्या हृदयी असतो फक्त
मातृरक्षणाचा ध्यास
प्रियजनांविषयी असते
विरह वेदनात मनात
मातृ सेवेची तळमळ मात्र
दिसते रोमरोमात
गोळ्या झेलीत जातो प्राण
मग कोसळतो धरणीवर
जाता जाता ही तिलक लावतो
मातृभूमीच्या मातीचा माथ्यावर
सळसळते रक्त त्यांचे
संपवण्या वैऱ्याला
प्राणांची बाजी लावतो
झोकून देतो स्वतःला
प्रेम करतात देशभक्त
मातीच्या कणाकणावर
नित्य दृष्टी त्यांची
देश सेवेच्या कर्तव्यावर
परिवाराहून प्रिय मानतात
आपल्या जन्मभूमीला
क्षणोक्षणी नमन माझे
या शूर देशभक्ताला
आनंदाने पेलतात सैनिक
देशवाशीयांच्या रक्षणाचा भार
ऋण जाणून त्यांचे
द्यावा त्यांच्या कुटुंबीयांना आधार
हातात शस्त्र
मनी मातृभूमीचा अभिमान
समोर उभा मृत्यू जरी
नसते त्याचे भान
सळसळते रक्त त्यांचे
वाढवण्या देशाची शान
फडकणारा तिरंगा
हाच त्यांचा अभिमान
सौ भारती राजेंद्र बागल
वडूज सातारा
8888071822
Sainikavar marathi kavita in 2024
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.
आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह