क्रांतिकारी विचारांच्या चौफेर कवियत्री, उत्तम लेखिका असलेल्या सरोजिनी नायडू यांच्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या Sarojini Nayadu Information In Marathi ब्लॉगमध्ये.
Sarojini Nayadu Information In Marathi

चोफेर कवियत्री, उत्तम लेखिका, राजकीय कार्यकर्त्या, महिला मुक्ती साम्राज्यवाद विरोधी विचारांच्या समर्थक, भारताच्या महत्त्वाच्या स्वातंत्र्य लढ्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सरोजिनी नायडू, यांना महात्मा गांधी यांच्याकडून भारताची नाइटिंगेल’ आणि भारत कोकिला अशी त्यांच्या लेखनामुळे कवितेमुळे महत्त्वपूर्ण उपाधी मिळाली. त्यांनी लिहिलेल्या कविता या वैचारिक प्रतिभाशाली गीतात्मक आणि गुणवत्ता असलेल्या असल्याकारणाने त्या या गोष्टींसाठी प्रसिद्ध होत्या.
13 फेब्रुवारी 1879 रोजी या धाडसी महिलेचा जन्म झाला. बंगाली कुटुंबात हैदराबाद मध्ये झाला यांचे शिक्षण लंडन मद्रास आणि केबिजमध्ये झाले. सरोजिनी यांनी इंग्लंडमध्ये मतधिकार वादी म्हणून काम केलं. भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आणि ब्रिटिश राजवटी पासून भारत मुक्त होण्यासाठी ते भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या चळवळीमध्ये सामील झाल्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या एक महत्त्वपूर्ण भाग बनल्या महात्मा गांधी यांनी पाहिलेल्या स्वराज्याच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्या धडपड करत होत्या. सरोजिनी नायडू यांचे लग्न गोविंदराजुलू नायडू 1898 मध्ये एक सामान्य चिकित्सक सोबत झाले.
सरोजिनी नायडू यांच्या कविता
सरोजिनी ह्या उत्तम कवियत्री होत्या. त्यांच्या कविता नेहमीच देशावर आणि देशभक्तीवर आधारित असायच्या. देशांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी सरोजिनी विद्रोही लिखाण करायच्या. ज्यामुळे त्या कविता वाचून लोकांमध्ये देशा साठी लढण्याची आणि ब्रिटीश यांच्या विरुद्ध लढण्याची एक उमेद निर्माण व्हायची.
सरोजिनी नायडू यांचे वैयक्तिक जीवन
हैदराबाद राज्यात 13 फेब्रुवारी 1879 रोजी या चट्टोपाध्याय कुटुंबात अघोरेनाथ आणि वरदा सुंदरी देवी यांच्या पोटी झाला.
हैदराबाद या ठिकाणी असलेल्या कॉलेजचे त्यांचे वडील प्राचार्य होते. ते एक बंगाली ब्राह्मण होते, काही काळानंतर तेच निजाम कॉलेज बनले सरोजिनी नायडू यांच्या आई सुद्धा कविता लिहायच्या त्या नेहमी कवितेला बंगाली भाषेमध्ये लिहायच्या.

कारकीर्द
सरोजिनी नायडू उत्तम भाषण देऊ लागल्या. आणि त्यामुळे त्या सर्वांना त्यांच्या बोलण्याने विचारत पाडणाऱ्या आणि सर्वांच्या बोलत्या बंद करणाऱ्या उत्कृष्ट वक्त्या बनल्या. महिलांचे असलेले हक्क, आणि त्यांना शिक्षणापासून वंचित का ठेवण्यात येत आहे ?अशा गंभीर विषयांवर नेहमी ते चर्चा करत. हे त्यांच्या भाषणाचे मेन मुद्दे असायचे भारतामध्ये स्त्रिया या शिक्षित व्हाव्या आणि त्यांच्या हक्काच्या लढाईमध्ये त्यांना त्यांचं अस्तित्व निर्माण करता यावं. यासाठी त्या नेहमी या विषयाला अनुसरून बोलायच्या. समाजाप्रती असलेली जागृती निर्माण करण्यासाठी त्या नेहमीच कार्यरत असायच्या. आणि समाजाला दिलेल त्यांचे हे योगदान त्यांच्या जीवनाचं सार्थक ठरलं 1911 मध्ये त्यांना केसर ए हिंदी पदक सन्मानित करण्यात आले. मात्र त्यांनी हे पदक जालियन बाग या हत्याकांडामध्ये 1919 मध्ये या निषेर्धाथ परत केले.
अहिंसा चळवळ
सरोजिनी नायडू या ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या अहिंसक प्रतिकारच्या महत्त्वपूर्ण चळवळीत सामील झाल्या. त्यांनी महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, गोपाळ कृष्ण गोखले, सरलादेवी चौधरी ,या थोर व्यक्तींची एक घनिष्ठ नातं निर्माण केलं. त्यांचा विश्वास जिंकून आणि त्यांच्या कार्याची पावती देत ते सत्याग्रह चळवळीमध्ये एक महत्त्वाची भूमिका करू लागल्या. सतत करत असलेल्या प्रयत्नांमुळे ब्रिटिश यांच्या राजवटी पासून भारत मुक्त होईल या विचाराने त्यांनी महत्त्वाचा एक भाग म्हणून ऑल इंडिया होमरूल लक्षात घेऊन त्या 1919 मध्ये इंग्लंडला गेल्या. आणि त्यानंतर तेथील पुढच्या वर्षांमध्ये त्यांनी भारताच्या असहकार चळवळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
सरोजिनी नायडू यांचा जीवन प्रवास
सरोजिनी नायडू यांनी त्यांची एक त्यांचा एक काव्यसंग्रह प्रसिद्ध केले त्या काव्यसंग्रहाचे नाव सरोजिनी द गोल्ड नथ्रेशहोल्डनंतर द बर्ड ऑफ टाईम १९१२ साली प्रकाशित केले. सोबतच त्यांनी द ब्रोकन विंग हे काव्यसंग्रह 1917 मध्ये प्रकाशित केले. सरोजिनी या क्रांतिकारी विचारांच्या विचारवंत आणि सर्वांच्या आवडत्या लोकप्रिय कवियत्री होत्या. त्यांच्या लेखनामुळे अनेक देशांमध्ये त्यांचं नाव लौकिक झालं. आणि भारतामध्ये भारतीय कोकिळा म्हणून सर्वीकडे त्यांची चर्चा सुरू झाली. त्यांचा उल्लेख त्या नावानेच केला जात होता.
Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह