ऋषिकेश कारभारी आव्हाळे आणि कु. कविता बाळासाहेब आढागळे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेतShikshak Din Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
माझे गुरुजी | Shikshak Din Kavita
काव्यबंध समूह आयोजित काव्यलेखन स्पर्धेसाठी
विषय:- शिक्षक दिन
शीर्षक:माझे गुरुजी

गुरुजी तुम्ही आहात खूपच महान
तूमच्यामुळे झाले माझे व्यक्तित्व छान
पुस्तकातील धडे देत
आयुष्याचे धडे तुम्ही मला दिले
माझ्या अबोल मनात
ज्ञानाचे अंकुर पेरले
वेळो वेळी त्या अंकुराला
ज्ञानाचे दिले खत
ज्ञानामुळे मिळेल
माझ्या आयुष्याला बरकत
तुमचे काही शब्द
अजून ही आठवतात
संकटात मला योग्य शिकवण देवून जातात
तुमची प्रत्येक शिकवण
राहील माझ्या स्मरणात
तुमची थोडी कमी भासते
आता आयुष्याच्या वळणात
तुम्ही दिली करून
ओळख माझी माझ्या स्वप्नांशी
मी घेतोय झेप आता
स्वप्न पूर्ण करण्याची
तुमची शिकवण आठवते क्षणोक्षणी
तुमचे नाव मोठे कार्याचे ठरवले मनोमनी
यशाची वाट दाखवली
मजला तुम्ही
त्या वाटेवर चालण्याचा
निर्धार केला मी
तुमच्यावर लिहायला
संपतील सारे पाने
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
देवून संपवतो मी माझ्या काव्याचे गाणे
-ऋषीकेश कारभारी आव्हाळे,
छत्रपती संभाजीनगर
बाकी काही नाही मडॅम | Shikshak Din Kavita
काव्यबंध शब्दसमुह
काव्यलतिका कविता स्पर्धा
विषय- शिक्षक दिन
शिर्षक- बाकी काही नाही मडॅम जरा बोलावंसं वाटलं..!

तो शाळेतला पहिला दिवस
आणि,ते रडणं कसलं.
तुम्ही दिलेला तो हातात हात
आणि ,डोळ्यातलं पाणी सुद्धा हसलं.
तुम्ही दिलेली ते प्रेम मनोमनी दाटल.
बाकी काही नाही मडॅम जरा बोलावंसं वाटल….
कधी-कधी तो मायेचा उबारा
आणि ,कधी-कधी ती रागावलेली छडी.
आज ही आठवते मायेनं भरवलेली, ती भातण-कडी .
आता तुम्ही जवळ नाही म्हणून एकटं वाटल .
बाकी काही नाही मडॅम जरा बोलावंसं वाटल…
होती थंडी कुडकुडची तरीही, तुमच्या अंगातल स्वेटर काढून दिल मला.
पोटच्या लेकरापलीकडे तुम्ही जपलं मला, तुमच्यासारख्या शिक्षकरुपी माय मला मिळाल्या.
आणि ,यातूनच सिंधुताई सपकाळ मला कळाल्या,
आता कळालं रुसून माझं फसलं
बाकी काही नाही मडॅम जरा बोलावंसं वाटल…
तुम्ही अक्षर गिरवता गिरवता , आव्हानांना पेलवनं हि शिकवल.
निराधार ह्या मातीच्या गोळ्याला, तुम्ही मात्र माणूस बनवलं.
शुन्यातून विश्व निर्माण करण्यासाच बळ तुम्ही दिलंस,
यातुनच सावित्रीबाई फुले चे शिक्षण मनात साठवल
बाकी काही नाही मडॅम जरा बोलावंसं वाटल….
तुमची शाबासकीची थाप पडता पाठिवर ,एक नवी ऊर्जा निर्माण होई.
त्यावेळी वाटे मनामध्ये ह्या स्वप्नांच्या, पलीकडले जाऊन इतिहास घडविण मी.
पण आज तुमच्या शाबासकीच कुठेतरी नवलच वाटल…
बाकी काही नाही मडॅम जरा बोलावंसं वाटल…
कवयित्री:कु .कविता बाळासाहेब आढागळे (अहमदनगर)

shikshak din kavita
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह