लोकमान्य टिळक माहिती 2023 | Free Balgangadhar Tilak Information In Marathi


लोकमान्य टिळक यांना आधुनिक भारताचा निर्माता असे गांधीजींनी ठळकपणे म्हटले होते. Balgangadhar Tilak Information In Marathi मध्ये आपण टिळकांचे झुन्जावाती जीवनचरित्र पाहणार आहोत.

अनेक सातान्त्र्य सैनिकांचे आदर्श असलेले लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे सर्वात पहिले नेते होते. लोकमान्य या शब्दाचा अर्थ लोकांनी मान्य केलेला असा नेता जो सर्वांसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

Balgangadhar Tilak Information In Marathi

बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला. असं म्हटलं जाते की, ते समाज सुधारक, वकील स्वातंत्र्य सैनिक ,भारतीय राष्ट्रवादी आणि अतिशय उच्च दर्जीय आणि उच्च विचारांचे शिक्षक देखील होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे हे लोकप्रिय नेते होते. म्हणून लोकांनी त्यांना लोकमान्य अशी उपाधी दिली.

कुठल्याही परिस्थितीला अतिशय खंभीरपणे उत्तर देणारे खंभीर पुरस्कर्ते देखील त्यांना म्हटले जाते. बाळ गंगाधर टिळक हे ब्रिटिश यांच्या राजवटीत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे उद्गार काढणारे पहिले लोकनेते होते. त्यांनी केसरी या वृत्तपत्राची स्थापना देखील केली. या वृत्तपत्राद्वारे लोकांना सहजतेने भाषा कळेल आणि ते उत्तर द्यायला खंभीर होईल एक हिंदू राष्ट्र निर्माण करू शकेल, स्वराज्य निर्माण होईल आणि ब्रिटिश इंग्रज हे आपल्या भारतातून निघून जाणार ,हा त्यांचा एक महत्त्वपूर्ण उद्देश होता.

त्यांना सहकार्य करणारे त्यांचे सहकारी बंधू म्हणजे लाला लजपतराय ,अरविंद घोष, मोहम्मद अली जिना ,आणि बिपिन चंद्र पाल ,यांच्या साह्याने त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली.

सुरुवातीचे जीवन

लोकमान्य टिळक हे शाळा महाविद्यालयांमध्ये गणित शिकवायचे. इंग्रजी शिक्षणाच्या नेहमी ते विरोधात असायचे. कारण त्यांना असं वाटायचं की ते भारतीय सभ्यतेचा अनादर करत आहे .आणि यामुळे ते नेहमी इंग्रजी या विषयावर टीका करायचे आणि तसाच त्यांचा समज होता. खरंतर बाळ गंगाधर टिळक हे चिखली गावात जन्म घेऊन रत्नागिरी गावातून आधुनिक महाविद्यालयात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे शिक्षण घेतले. भारतामध्ये भारतीय पिढीतील पहिले सुशिक्षित नेते लोकमान्य टिळक होते.

भारतामध्ये शिक्षण व्यवस्था ही हालाखीची असल्यामुळे शिक्षण जनसामान्य पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आणि याद्वारे शिक्षण प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी मदत केली.

ब्रिटिश राजवट ही भारतावर अधिक प्रमाणात गुलामगिरी करत होती, प्रत्येकाला त्यांनी गुलाम करून ठेवलं होतं. या सर्व गोष्टींची लोकमान्य टिळक यांना चिड येत होती. त्यांनी या ब्रिटिश राजवटीच्या कार्यावर टीका केली .आणि ब्रिटिश सरकारने आम्हाला आमचं राज्य द्यावं यासाठी त्यांचा हा प्रयत्न होता .केसरी वृत्तपत्र काढल्यानंतर ते इंग्रजांविरुद्ध अतिशय प्रखर आणि कठोर भाषेत लिहीत यामुळे इंग्रज सरकारने त्यावेळी त्यांना तुरुंगात कित्येकदा पाठवले पण त्यांनी थांबले नाही.

काँग्रेसमध्ये सामील

लोकमान्य टिळक हे काँग्रेसमध्ये सामील झाले होते. परंतु काही काळानंतर त्यांनी काँग्रेस पासून लांबी निर्माण केली. आणि त्यांच्या विरोधात सयंमी वृत्तीचा विरोध करणे सुरू केला. आणि त्यांच्या विरोधात बोलू लागले, अशा प्रकारे अनेक नेतेही काँग्रेसच्या विरोधात जाऊ लागली आणि त्यांच्या निषेधार्थ बोलू लागले असे भरपूर दिवस चालले.

लाला लजपत राय, बिपिन चंद्र पाल, आणि लोकमान्य टिळक हे तिघेही गरम दलामध्ये शामिल होते, या तिघांनाही लाल बाल पाल म्हणून ओळखल्या जात असे . 1908 मध्ये झालेला खुदीराम बोस यांच्या बॉम्ब हल्ल्याचे या तिघांनीही समर्थन केले. यामुळे बर्मा मंडले यासारख्या ठिकाणी त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले तर तुरुंगामध्ये गेल्यानंतर आणि जेव्हा बाहेर पडले तेव्हा ते पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (बाल-पाल-लाल त्रिकूट)

लोकमान्य टिळक जेव्हा तीस वर्षाचे होते तेव्हा विल्यम वेडरबर्न यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनात सर्वप्रथम भाग घेतला. त्यावेळेला तयार झालेले दोन युवक, म्हणजेच लाला लजपतराय, यांचे त्यावेळी वय हे ३४वर्षे होते .आणि गोपाळ कृष्ण गोखले यांचे वय ३३ वर्ष होते. हे युवक काँग्रेसमध्ये सर्व प्रथमच दिसत होतें.

काँग्रेसमध्ये 1885 मध्ये मध्यमवर्गीय लोकांचे वर्चस्व होते .मात्र काही काळानंतर निष्पक्षतेच्या भावनेवर आणि चळवळीच्या इतर घटनात्मक आणि कायदेशीर पद्धतीवर या सर्वांचा विश्वास होता. परंतु काही काळानंतर लॉर्ड कर्झनच्या फाळणीच्या निर्णयामुळे संपूर्ण काँग्रेसच बदलून गेलं .भारतामध्ये असलेले तरुण हे अतिरिक राजकारण आणि थेट चुकीच्या कृतीकडे वाटचाल करू लागले. परंतु त्यावेळीही लोकमान्य टिळक न डगमगता बिपिन चंद्र पाल आणि लाला लजपतराय यांच्यासोबत मिळून ब्रिटिशांच्या तडाडून विरोध केला .आणि मध्यमवर्गाच्या जो राजकीय पक्ष सत्र होता त्यांचा निषेध केला.

लेखामुळे देशद्रोहाचा आरोप

बाळ गंगाधर टिळकांनी एकदा त्यांच्या ‘केसरी’ या पत्रात ‘देशाचे दुर्दैव’ असा लेख लिहिला होता, त्यात ब्रिटिश सरकारच्या धोरणांना विरोध करण्यात आला होता. यामुळे, त्यांना 7 जुलै 1897 रोजी देशद्रोहासाठी अटक करण्यात आली. त्यांना मंडाले (ब्रह्मदेश) तुरुंगात 6 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

लोकमान्य टिळका हे विद्रोही लेखक होते. ज्यामुळे त्यांना देशद्रोहासाठी अटक करण्यात आले होते. ती वेळ म्हणजे 1897 तेव्हा त्यांनी त्यांच्या केसरी वृत्तपत्रांमध्ये देशाचे दुर्दैव असा लांबलचक लेख लिहून ब्रिटिश सरकारच्या धोरणावर अतिशय ठळकपणे विरोध केला होता. त्यामुळे त्यांना त्या वेळेला अटक करण्यात आले इतकंच नाही तर मंडाले तुरुंगात सहा वर्षांच्या सक्षम कारावासाची शिक्षा देण्यात आली होती.

समाप्त


Kalpana Chawala Information in Marathi

Shiv Jayanti Information in Marathi 2023

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024

प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरं की खोटं | Best Social Media love poem in marathi in 2024

सौ. रेखा पिंगळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Social Media love poem in marathi in 2024…

2 months ago

प्रेम | Best love poem marathi online pdf in 2024

शालिनी सदाशिव पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem marathi online pdf in 2024 विषयावर…

2 months ago