“शामची आई” चे लेखक साने गुरुजी यांचे Sane Guruji Information In Marathi या Article मधून एक सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी असे विविध पैलू आपण अभ्यासणार आहोत.
साने गुरुजी यांचे पूर्ण नाव “पांडुरंग सदाशिव साने” असे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव “सदाशिव साने” होते. ते कोर्टामध्ये काम करीत होते. साने गुरुजी यांच्या वडिलांच्या काळी त्यांचे घर फार श्रीमंत होते मात्र हळू हळू त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळत चालली होती आणि त्यांच्या वडिलांच्या काळात तर परिस्थिती एवढी बिकट झाली की, त्यांचं घर सुद्धा जप्तीस गेले.
अशा गरिबीत 24 December 1899 रोजी “पांडुरंग सदाशिव साने” उर्फ साने गुरुजी यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहराजवळील पालगड येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचं नाव यशोदाबाई सदाशिव साने होते. त्यांच्या आईने त्यांना लहानपणापासूनच सुसंस्कृत केले आणि त्यांचेच संस्कार त्यांच्या बालमनावर घडले. परंतु त्यांची आई यशोदाबाई यांचा सन 1917 मध्ये निधन झाले. त्यांना त्यांची आई खूप प्रिय होती. त्यांनीच त्यांच्यावर घडवलेले सर्व संस्कार आणि त्यांच्या आई सोबत घालवलेले काही क्षण हे सर्व एकत्रित करून त्यांनी “शामची आई” ही पुस्तक नाशिक मधील तुरुंगात असतांना लिहिली.
आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायचे असतील तर “शामची आई” ही पुस्तक एकदा नक्की वाचावी असं मला वाटते. त्यांना कविता लिहिण्यात देखील रस होता. साने गुरुजी महात्मा गांधी यांच्या विचारांशी फार प्रभावित होते.
खालील चित्रावर क्लिक करून तुम्ही श्यामची आई हे पुस्तक विकत घेऊ शकता. चित्रावर Amazon Store ची affiliate लिंक दिलेली आहे.
साने गुरुजी यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या जन्मगावी म्हणजेच दापोली शहरातील पालगड या ठिकाणी झाले. त्या नंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी पुणे येथील त्यांच्या मामाकडे पाठविण्यात आले. परंतु त्यांचे मन पुण्यामध्ये रमले नाही त्यामुळे ते परत पालगड ला आले आणि जवळच्याच दापोली शहरात ते पुढील शिक्षण घेऊ लागले. येथे त्यांची मराठी आणि संस्कृत या भाषेवर प्रभुत्व मिळवणारे हुशार विद्यार्थी म्हणून ओळख झाली. दापोली येथे शिक्षण घेत असतांना त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणखी जास्त खालावली त्यामुळे त्यांच्या वडिलांना साने गुरुजींचे पुढील शिक्षण न परवडण्यासारखे झाले. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी पुणे येथील औंध संस्थेमध्ये दाखल केले. त्या संस्थेत गरीब मुलांना विनामूल्य शिक्षण आणि मोफत जेवण दिले जाते होते. त्यानंतर औंध संस्थेमध्ये प्लेग नावाची महाभयंकर साथ आली त्यामुळे तेथील सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यात आले.
साने गुरुजी यांच्या वडिलांची फार ईच्छा होती की आपल्या मुलाने म्हणजेच साने गुरुजी यांनी खूप शिकावे. त्यांची ईच्छा पुर्ण करण्यासाठी साने गुरुजी परत पुणे ला गेले आणि तेथील नूतन मराठी विद्यालय मध्ये विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. तिथे त्यांना फार त्रास सहन करावा लागत होता. वेळेवर जेवण मिळत नव्हते की मिळाले तरी देखील पोट भर जेवण मिळत नव्हते. एव्हढे त्रास सहन करून देखील त्यांनी तिथे आपले शिक्षण पूर्ण केले आणि सन 1918 साली त्यांनी हायस्कूल मधून मॅट्रिक चे प्रमाणपत्र मिळविले.
मॅट्रिक चे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण सर परशुरामभाऊ कॉलेज मधून केले त्यात त्यांनी BA ची Degree मिळविली नंतर पुढे त्यांनी मराठी आणि संस्कृत विषयात मास्टर केले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी 6 वर्षे शिक्षक म्हणून काम केले. तेथील वसतिगृहात वॉर्डन म्हणून देखील काम केले. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतःचे उदाहरण देऊन स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.
शाळेमध्येच शिक्षक असतांना त्यांनी “विद्यार्थी” या नावाचे मासिक चालू केले. जे विद्यार्थ्यांना फार आवडले आणि ते प्रचलित सुद्धा झाले. सहा वर्षे त्या शाळेत नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वतःचे पुढील आयुष्य स्वातंत्र्य लढ्यासाठी समर्पित केण्याचा निर्णय घेतला.
स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी सन 1930 साली शालेय नोकरी चा राजीनामा दिला. त्यावेळी महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा चालू केली होती. साने गुरुजी यांनी सन 1930 ते सन 1947 या कालावधीत त्यांनी अनेक वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी घेतला आणि त्यासाठी त्यांना 8 वेळा तुरुंगात टाकण्यात आले होते. त्रिचिनापल्ली, नाशिक, येरवडा आणि जळगाव येथील तुरूंगात एकूण सहा वर्षे सात महिने वेगवेगळ्या ठिकाणी तुरुंगात टाकले होते.
साने गुरुजीयांनी तमिळ आणि बंगाली भाषा त्रिचिनापल्ली या तुरुंगात असतांना शिकले आणि “शामची आई” ही त्यांची सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिक येथील तुरुंगवासात असतांना लिहिलेली होती.
सन 1936 साली जळगाव जिल्ह्यातील फैजापूर येथे काँग्रेस चे अधिवेशन यशस्वी होण्यासाठी काम केले. त्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन महत्वाची भूमिका निभावली होती. फैजापूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी ‘मैला वाहणे’ व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली.
सन 1942 रोजी त्यांनी “भारत चोडो” सहभाग घेतला होता आणि त्यासाठी त्यांना 15 महिन्यासाठी तुरुंगात टाकले गेले होते.
त्यावेळी समाजात जिकडे तिकडे जातीभेद, दलीत लोकांना मिळणारी वागणूक, अस्पृश्यता या सारख्या अनेक चाली रूढी होत्या. साने गुरुजी यांनी अशा रूढी परंपरा चा कडाडून विरोध केला.
सन 1946 साली त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला कारण पंढरपूर येथील विठ्ठलाच्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळत न्हवता. काही केल्या हा प्रश्न सुटेना त्यासाठी त्यांनी शेवटी उपोषणाचा मार्ग निवडला आणि 11 दिवस उपोषण केल्यानंतर अखेर अस्पृश्यांना पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळाला. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले होते.
सन 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या केली गेली. याचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला. त्यामुळे ते फार अस्वस्थ झाले होते. अखेर त्यांनी 11 जून 1950 रोजी झोपेच्या गोळ्यांचा अती वापर करून आत्महत्या केली.
Author:- आशु छाया प्रमोद (रावण)
समाप्त
मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…
अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर…
सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर…
प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर…
सौ. रेखा पिंगळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Social Media love poem in marathi in 2024…
शालिनी सदाशिव पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem marathi online pdf in 2024 विषयावर…