शिवाजीराव जाधव आणि डॉ. आम्रपाली गवळी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत motivational marathi kavita on life विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
motivational marathi kavita on life
काव्यबंध समूह आयोजित स्पर्धा
01/10/2023
आयुष्य | motivational marathi kavita on life
जन्माला येणे आणि हा जन्म सोडून जाणे
एक श्वास घेणे आणि
एक घेतलेला श्वास बाहेर सोडणे
यामधील अंतर/वेळ म्हणजे -आयुष्य
मागचे पाऊल पुढे टाकणे
पुढचे पाऊल मागे जाणे
दोन्ही पावलातील कापलेले
अंतर म्हणजे -आयुष्य
बुद्धिला झेपेल तसे जग पाहणे
पाहिलेले जग-जीवनात भोगणे
भोगलेले सुखदुःखाचे क्षण
सोसने नी पुढील प्रवास म्हणजे-आयुष्य
पुढील प्रवासात ऊन-सावली
क्षणोक्षणी सोसवेल अशी मागणे
मागणीप्रमाणे किती नी कसे
आपण न ठरवता मिळणे म्हणजे-आयुष्य
डोळे आपलेच दृष्टी पण आपलीच
पण उघड्या डोळ्यांपेक्षा
बंद डोळ्यांनी जीवन
दिसते ते म्हणजे-आयुष्य
कोण तो ज्याने जग जिंकलं
जग जिंकणारे असतात खरे,
पण त्याने मंन जिंकलं का ?
हे अंतर्मुख होऊन पाहणे म्हणजे-आयुष्य
आयुष्य कळावे त्याला
ज्याने जगाला तोंड दिले
त्यालाच कळले आयुष्य
मानवाचे काय असते –
भरून उरला सागर पाण्याने
पण तो पाणी कधी पीतच नाही
याची कल्पनिक नाही
साक्षात मूर्ति करून पहा
आयुष्य कळेल
आयुष्य किती ?
शंभर वर्षे – हजार वर्षे
कि युगान-युगे ?
डोळ्यांची पापणी लवते
उघडझाक करते
त्यातील अंतर त्यातील अंतर म्हणजे-आयुष्य
जेष्ठकवी :- शिवाजीराव जाधव
यवत तालुका दौंड जिल्हा पुणे
Mob. No.- 7040521862
motivational marathi kavita on life
काव्यबंद समूह आयोजित
काव्यलतिका साप्ताहिक स्पर्धा.
रविवार दि. १/१०/२०२३
विषय – आयुष्य
नव्यानं भरायच | motivational marathi kavita on life
आयुष्यात माणसे येतात आणि आयुष्य बदलून जातात यालाच आयुष्य म्हणायचं का?
सुखदुःख कशात आहे हे बघण्यात आपले आयुष्य गेले
आयुष्याच समाधान कशात आहे हेच मात्र आपण विसरून जातो ….
आयुष्यातले खडतर दिवस कधी निघून जातील याची वाट मी खूप आधीपासून बघत होतो पण त्याच्या अनुभवाची शिदोरी मी गाठ बांधून मनाशी जपून ठेवली होती…..
आनंदाची दिवसांना जपून ठेवावसं वाटलं पण क्षणात निघून गेले आठवण मात्र कायमची देऊन गेले….!!
आयुष्यात सुखदुःखाची किंमत तेव्हा कळली जेव्हा “हेही दिवस जातीलच” हेच वाक्य कानावर पडले!!!
आयुष्यात सुख आणि दुःख सारखच आहे आनंदात कधी झोप येत नाही आणि दुःखात कधी झोप लागत नाही हेच आयुष्याचं गमक आहे…!!!
आयुष्य झाड आहे त्याला जेवढे फुलं- फळं येतील त्याचा आनंद घ्या
त्यावर राहणारे काट्यांची तक्रार करत राहायच का ?
हे आपल्या हातात आहे…!
आयुष्य नव्यानं भरायच!!!
@ डॉ.आम्रपाली गवळी, संभाजीनगर
motivational marathi kavita on life
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.
आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह